मुंबई : राज्यात अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहुन घेण्याचं काम सुरू आहे. पक्षाचे सदस्य असताना तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे प्रतिज्ञापत्र लिहिण्याची गरज नसते किंवा कुठल्याही पक्षात जाण्याचं कोणतंही बंधन नसतं. शिवसैनिकांकडून जे काही प्रतिज्ञापत्र लिहुन घेतलं जात आहे. ते फक्त दिशाभुल करण्यासाठी आहे. त्यासाठी कोण शंभर रूपये काढणार आहे. शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता हा 20 रूपयांचा वडापाव खावून पक्षाचा प्रचार प्रसार करत असतो. एकतर 20 रूपयाला वडापाव येतो आणि त्याच्यावर 100 रूपयाचा प्रतिज्ञापत्र काढायला सांगता. अंस वक्तव्य बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढल्यावर बंडखोर आमदार आक्रमक
तुमच्यावर जर बळजबरी होत असेल तर जरूर करा, परंतु आपलं हे शिवबंधन हे प्रेेमाचं नातं असून ते अबाधित राहणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं कोणतंही विधान आलं तर आम्ही त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. कारण ते आमचे नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी काढलेलं कोणतंही विधानाला आम्ही कोणतंही उत्तर देणार नाहीत. कदाचित पुढच्या काळात शिंदे साहेब पुढे वेगळी भूमिका घेतली तर ते वेगळं ठरेल. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला उत्तर आहेत. मात्र त्यांच्या नाती जुळली आहेत. त्यामुळे आम्ही असं करणार नाही. असंही ते म्हणाले.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातून पाटलांचा पत्ता कट; भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गतीने काम करायला सुरूवात केली आहे. असंही ते म्हणाले त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची ज्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी निवड कऱण्यात आली तेव्हा काही आमचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं देखील दिपक केसरकर म्हणाले आहेत.
ज्यांनी हे सरकार केले, त्यांच्या मते त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो. जर हे पुर्वीच केलं असतं तर आता अडीच वर्ष पुर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. त्यामुळे लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे. मतदारांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Read also
- आरे मेट्रो कारशेडबाबत आता मनसेचा प्रंचड विरोध; अमित ठाकरेंची सनसनीत पोस्ट
- आदित्य ठाकरे पक्षातील घाण गेली म्हणतात, अन् ठाकरे बंडखोर आमदारांना आवाहन करतात
- ब्रिजभूषण सिंहांकडून शरद पवार ‘चितपट’; महाराष्ट्र कुस्ती परिषद बरखास्त
- “कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र”
- शिवसैनिकांनी आपल्या जनतेच्या सेवेसाठी..;” दिपाली सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन