नाशिक : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आघाडीतील विकास कामांना ब्रेक लावण्यात आला आहे. एकनाथजी शिंदे यांनी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे.
“तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आघाडीत कॅबिनेट मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. याच दरम्यान जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते. त्याचसंदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी विचारण्यात आला आहे. बंडखोर आमदारांपैकी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे नाशिकचे आमदार आहेत.
विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
सुहास कांदे यांनीच यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या कानावर गोष्ट घातली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेड मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लावला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर लगेचच या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलचं सुनावलं होतं.
विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
दरम्यान, तुमचा माझ्यावर राग असेल तर माझ्यावरच काढा, तो राग मुंबईवर काढू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. तसेच आम्ही फक्त लोकांच्या विकासाचा काम करत आहोत. असंही प्रत्युत्तर शिंदेंनी ठाकरेंना दिलं होतं. तसेच ज्या ठिकाणी २५ टक्के काम झालं आहे. त्याचठिकाणी पुढील काम सुरू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड प्रकल्पावर दिली आहे.
Read also
- शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची ? अखेर या प्रश्नावरील पेच सुटला
- विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आघाडीकडून मोठी खेळी; शिवसेना आमदारालाच दिली उमेदवारी
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
- राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का
- “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”