नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भात निवडणुक आयोगाकडे लेखी उत्तर देण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शिंदे गटातील वकील आणि ठाकरे गटातील वकिलांनी आपला लेखी उत्तर निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यावर आता निवडणुक आयोग काय निर्णय देणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत रस्सीखेच आणखीच वाढली, शिवसेना, काॅंग्रेसमध्येच जुंपली
निवडणुक आयोगाकडे दिलेल्या लेखी उत्तरात ठाकरे गटाने बंडाळीचा संपुर्ण घटनाक्रम दिला आहे. यामध्ये 21 जुनपासूनचा घटनाक्रम लेखी उत्तरात मांडला आहे. एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे बंड केलं हे मेल द्वारे अनिल देसाई यांनी मांडलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचं मुख्यनेते पद हे घटनाबाह्य असल्याचा दावा देखील त्यांनी यामध्ये केला आहे.
त्याचबरोबर शिवसेनेची घटना आधी 40 आमदारांना मान्य होती. मग त्यानंतर ती नकोशी का वाटली? सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवादचा संदर्भातही जोडण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील वकिलांनी देखील लेखी उत्तर निवडणुक आयोगाकडे सादर केलं आहे. यात मुळ शिवसेना आम्हीच असल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे.
ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक
दरम्यान, मुळ पक्ष आमचाच आहे. त्यामुळे आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं. एकनाथ शिंदे यांचं मुख्यनेता पद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिंधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. बहुमत देखील आमच्याकडे जास्त आहे. चिन्ह देतांना संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींचा विचार करून देण्यात यावा, असं शिंदे गटाच्या वकिलांनी आपल्या लेखी उत्तरात नमुद केलं आहे.
Read also
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!
- “माझाच विजय झाला आहे, आता फक्त निकालाची वाट”, मतमोजणीआधी सत्यजीत तांबेंचा विश्वास
- पुण्यात आपचं संघटन वाढतयं…! काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन
- “..तर त्यावेळी महेश लांडगे हे शिवसेनेचे आमदार झाले असते”, शिंदेंनी सांगितली जुनी आठवण
- “हिंदु आक्रोश मोर्चा हा मोदी आणि शहांच्या विरोधात,” संजय राऊतांची भाजपवर प्रखरशब्दात टिका