मुंबई : राज्यात आणि देशात मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद अन् इतर मुद्यांवरून हिंदू जन आक्रोश मोर्चा निघत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या शहारांत हिंदुत्वादी संघटनांनी हे मोर्चे काढले आहेत. यातच काल मुंबईत जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चोच भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सत्यजीत तांबेंचा भाजप कनेक्शन, थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन घेतली जिल्हाध्यक्षांची भेट
संजय राऊत म्हणाले की, कालचा जो मोर्चा काढण्यात आला होता, तो कुणी आणि कुणाविरोधात काढला होता, ते अजून स्पष्ट झालं नाही. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातील भाजपच्या युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध मोर्चा काढला की काय ? असं क्षणभर वाटलं. महाराष्ट्रामध्ये जर हिंदु जनआक्रोश मोर्चा निघाला असता तर हे आव्हान मोदी आणि शहांना आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ तसेच देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते स्वत:ला कडवट हिंदुत्वावादी म्हणून घेणारे नेते आहेत. त्यांचं दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे. केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्वाचं सरकार आहे. अत्यंत प्रबळ आणि शक्तिमान दोन्ही नेते आहेत. तरीही धर्मांतर होत असतील तर लव्ह जिहाद सारखे विषय घडत असतील हे या सरकारचं अपयश आहे.
त्यामुळे न्याय मागण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या शिवसेना भवनाच्या पुतळ्यासमोर अत्यंत व्यथीत मनाने जमलेले दिसताहेत.खरं म्हणजे हिंदुचा आक्रोश काय आहे. हे बघायचं असेल तर काश्मीरला जावं. हिंदु पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताहेत. ते आपल्या घरी जाऊ शकले नाहीत. हा हिंदु आक्रोश मोर्चा काढला आहे. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला होता. तेव्हा या मोर्चा करणाऱ्यांच्या तोंडाला बुच का बसला होता. ? शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. त्याठिकाणी त्यांचा हिंदु आक्रोश नाही यांचा. काश्मिरच्याबाबतीत, रामभक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या, तसेच वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान नाही, त्यांच्याविरोधात का आक्रोश मोर्चा काढत नाहीत. असंही त्यांनी सांगितले.
Read also
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत रस्सीखेच आणखीच वाढली, शिवसेना, काॅंग्रेसमध्येच जुंपली
- “बागेश्वर बाबा जिथं दिसेल, तिथे त्याला ठोकून काढा,” संत तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानानंतर मिटकरी आक्रमक
- ”मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा, 2024 ला पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…” बड्या नेत्याचं भाकित
- ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक
- कसबा पेठ पोटनिवडणुक मनसेने लढवावीच,; मनसेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे मागणी