औरंगाबाद : दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, मुंडे समर्थकांचं राजीनामासत्रही सुरु झालं होतं. यांनतर मुंबईमध्ये मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नाराज असल्याच्या आणि पक्ष बदलण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. तसेच, समर्थकांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन केलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकाच वाटेवर?
या पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी, औरंगाबादेत बोलत असताना पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिला आहे. “पंकजा मुंडे माझी बहीण आहे. तिच्यावर अन्याय झाला असेल तर, तिनं मला सांगावं मग मी बघतो”, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मुंडे यांच्या नाराजीज नाट्यावर चर्चा सुरु झाली आहे .
“खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…”, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
त्याचबरोबर त्यांनी, “मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं. तर मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल. एमपीएससी बिंदू नामावलीच्या नावाखाली धनगर, वंजारी यांना नेहमीच डावल्याचा प्रयत्न केला जातो. याविषयात एमपीएससीनं लक्ष दिलं पाहिजे. ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वत: कमिटीचं प्रमुख व्हावं आणि ओबीसींची डेटा तयार करावा”, अश्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.
तसेच, “ओबीसी समाजासाठी रासप २९ ऑगस्टनंतर मुंबईतून जनजागृती अभियान सुरु करणार आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोवर परत मिळत नाही तोवर निवडणुका होऊ देणार नाही”, असं सांगत केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं इम्पिरिकल डेटा तयार करावा”, अशी आक्रमक त्यांनी मांडली आहे. यावेळी, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीवर रासपने लक्ष केंद्रीत केलं असून, ५० आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू,” अशी दमदार घोषणाही त्यांनी या दौऱ्यावर केली आहे.
Read Also :
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत केलेला तलवारीचा नंगा नाच अबू आझमींना भोवला, १७ जणांविरोधात नोंदवला गेला गुन्हा
- …अन्यथा, 20 ऑगस्टला “अशोक चव्हाणांच्या घरापुढे मूक मोर्चा काढणार”संभाजीराजेंची घोषणा
- २०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
- शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?
- नाशकाताही राष्ट्रवादी-शिवसेनेत ठिणगी; उड्डाणपुल उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन भुजबळ, शिवसेना खासदारावर नाराज