पुणे : केंद्र सरकार १०२ व्या घटना दुरुस्तीवर आज संसदेत एक महत्त्वाचे विधेयक पारित करणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चांचा त्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संक्षिप्त आढावा दिला. या बैठकीला मराठा अभ्यासक आणि कायदेतज्ज्ञही उपस्थित होते. यावेळी, येत्या २० ऑगस्टला अशोक चव्हाणांच्या घरापुढे मूकमोर्चाचे आयोजन करणार असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले.
२०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
तसेच, बैठकीबाबत अधिक बोलताना त्यांनी सांगितले, “१०२ व्या घटनादुरुस्तीसंदर्भात आम्ही चर्चा केली. मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा, ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून आढावा घेण्यात आला. राज्य सरकार विसरले आहे, आपण रिव्ह्यू याचिका दाखल केली आहे”, असा इशारा त्यांनी सरकारला देत, “गायकवाड समितीत त्रुटी असतील तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. राज्य सरकारने समाजाला सामाजिक मागास दाखवणे आवश्यक आहे”, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?
यावेळी, “माझी भूमिका स्पष्ट आहे, पण मी खरंच गोंधळून गेलो आहे; की आरक्षण नेमक्या कोणत्या मार्गाने मिळणार आहे. आता टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हे राज्य सरकारने ठरवावं. मला राजकीय धोका नाही पण समाजाची भीती आहे”, असं स्पष्ट करत, “मी मराठ्यांचं नेतृत्व करत असलो तरी मी वंचितांचा नेता आहे”, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, यावेळी समन्वयकांचाच गोंधळ पाहायला मिळाला. मात्र, संभाजीराजे सगळ्यांची समजूत काढत वातावरण शांत केलं.
दुसरीकडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक काल पार पडली. या बैठकीला राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. जवळपास २ तास चाललेल्या या बैठकीत, “मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता खेळ नको. आम्ही जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली गेली नाही, तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही”, असा सज्जड दम देण्यात आला.
Read Also :
- अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
- सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका – आशिष शेलार
- संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
- अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
- मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार