मुंबई : हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले आहे. ऋतुजा लटके यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरायला अडथळे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवायची होती तर आधीच दाखवायला हवी होती. आता पराभव दिसत असल्याने हे उशिरा आलेलं शहाणपण आहे. असं म्हणत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं भुजबळांचं काम”; शरद पवारांकडून भुजबळांचा सन्मान
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार माघारी घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आपला उमेदवार माघार घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही निवडणुक आता बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार
भाजपने आपला उमेदवार माघारी घेतल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे, ज्यामध्ये एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यतो निवडणूक बिनविरोध होते. तसेच या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही त्यांनी केला. या निर्णयातून अनावश्यक गोष्टी टळल्या आहेत. ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून आणण्याच्या निर्णयाचे जयंतराव पाटील यांनी मनापासून स्वागत केले.
Read also
- “अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे, हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”
- “राजकरणातील विद्यापीठ पवार साहेब आता मैदानात उतरलेत, लक्षात ठेवा”; रूपाली पाटलांनी सुनावलं
- “फडणवीस साहेब अंहकार बरा नव्हे, नियती तो कधी ना कधी उतरवतेच”; राष्ट्रवादीचा टोला
- अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार..! ऋतुजा लटकेंचा मार्ग मोकळा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!