मुंबई : अॅड. गुणरत्ने सदावर्ते वकिल झाल्यावर अलिकडच्या काळात त्यांनी ‘बार कॉन्सिल’ ची निवडणूक लढवली. त्यांच्या भडक भाषणांच्या सुरस कथा तुमच्या एखाद्या वकील मित्रा कडून ऐका. एसटी कामगारांपुढील विखारी व विषारी भाषणाचे नवल वाटणार नाही. ही भाषणे न्याय पालिकेतील अनेक उच्च पदस्थांना माहिती आहेत. एसटी कामगारांमध्ये द्वेष भरून टोकाची भुमिका घ्यायला लावल्यामुळे, अनेक कर्मचार्यांनी आयुष्य संपवले. असं धक्कादायक विधान राष्ट्रवादी काॅंग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलना अचानक हिंसक वळण लागले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला केला. या हल्ल्यामागे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांचा हात असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर अशातच आज एका जुन्या प्रकरणामुळे सातारा पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी फेसबुक सदावर्ते यांच्याबद्दल पोस्ट लिहीली आहे.
“साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे
गुणरत्नांचा थोडा सहवास आम्हाला लाभला. मी शिक्षण घेतलेल्या शासकीय दंत महाविद्यालयातूनच हे महाशय डेंटिस्ट झाले. औरंगाबाद च्या शासकीय दंत महाविद्यालयात प्रथम वर्ष परीक्षेत सलग चार वेळा ‘ गुणवत्ता पुर्ण नापास’ होण्याचा पराक्रम केल्या बद्द्ल त्यांना दंत वैद्यकीय शिक्षणापासून प्रतिबंध करण्यात आला. त्यानंतर गुणरत्नांनी त्यांच्या गुणांचे प्रदर्शन करत चित्र विचित्र आंदोलने केली. हि आंदोलने जाणून घेण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद घाटी परीसरात शिक्षण घेतलेल्या मेडीकल व डेंटल कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थांना विचारा.मग ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दर्जा का खालावला, भाषा का बदलली ते लक्षात येईल. असं त्यांनी त्यात म्हटलं आहे.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी
गुणरत्नांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून महाराष्ट्रातील आंदोलनांची प्रतिमा मलीन करणाऱ्या लोकांच्या ही मनोवृत्तीची किव करावी वाटते. त्यांना पडद्याआड कुठुन तरी रसद असल्याशिवाय शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला करण्याची हिंमत होत नाही. विकृत, भडक, द्वेष पसरवणार्या व्यक्तींना किती प्रसिद्धी द्यायची याचा मिडीयाने ही विचार केला पाहिजे. टिआरपी च्या खेळात महाराष्ट्रातील राजकारणाची, विधायक आंदोलनाची प्रतिमा आपण मलीन करत आहोत ही जाणीव मिडीयाने ठेवली पाहिजे. घरावरील हल्ल्याच्या वेळी नेहमी संवेदनशील असणाऱ्या खा. सुप्रिया ताई सुळे यांचे कणखर तेचे व त्याच वेळी संवेदनशीलतेचे दर्शन महाराष्ट्राला झाले.
Read also:
- “सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’
- राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत; रामदास आठवलेंचं वक्तव्य
- “सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा
- “मनसेला जवळ केल्यास फटका बसू शकतो, याचा अंदाज भाजपला आला असेल”; जयंत पाटलांचा टोला
- ..तर पक्षांवर देखील कारवाई होईल; विक्रांत प्रकरणावरून सरकारी वकिलांनी दिला इशारा