मुंबई : गेल्या काही वर्षातील परळी येथील तरूणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलचं चर्चेत आलं होतं. या प्रकरणाबाबत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता त्यांनी मंत्रिपदासंबंधी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
“फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी
संजय राठोड म्हणाले की, जेव्हा मी स्वत:हून राजीनामा दिला होता तेव्हा आपल्या चॅनलसमोर येऊन हेच बोललो होतो की महाराष्ट्रात अतिशय खालछ्या दर्जाचं राजकारण सुरू आहे. गेली 30 वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात मी चारवेळा प्रचंड मतांनी निवडून आलोय. कोणीही असे आरोप करून माझे संपुर्ण जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रकार झाला तो अतिशय निंदणीय आहे. मी राजीनामा देतो चौकशी देखील होऊ द्या. त्याप्रमाणे मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला.
“आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
ते पुढे बोलताना म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता. तेव्हा म्हटलं होतं की माझी चौकशी करा. मला परत मंत्रिपदाची जबाबदारी द्यायची की नाही त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिलीच होती. मात्र घाणरेड्या राजकारणामुळे मला राजीनामा द्यावा लागला. असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
दरम्यान, संजय राठोड यांनी वाशिम येथे एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील राजकारणी नेते काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे
- शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी
- भाजपच्या हुकुमी एक्काला अटक होणार! न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
- मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा
- कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’