मुंबई : आज संपुर्ण भारतात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जात आहे. समाजसुधारक, क्रांतीकारक, लेखक, क्रांतीसुर्य अशी वेगवेगळी ओळख असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांना आज अभिवादन केलं जात आहे. विविध शहरात, गावांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक
गेल्या अनेक वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी केली जात आहे. परंतु अद्यापही त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आमला नाही. यावेळी काॅंग्रेसचे नेते गिरीश पांडव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे यावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आज केंद्र सरकारकडे त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करीत आहे. जो पर्यंत महात्मा फुले यांना भारतरत्न मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असा इशारा देखील गिरीश पांडव यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
दरम्यान, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. तसेच 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे. कोरोनामुळे मागील काही वर्षी महामानवाच्या जयंत्या मोठ्या धुमधडक्यात साजऱ्या करता आल्या नाहीत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जयंत्या मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचं म्हटलं आहे.
Read also:
- “आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
- तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
- सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
- एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
- “आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”