मुंबई : कोराना काळात केंद्र सरकर आणि राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लोकांना घरातच बसण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही देखील काही नागरिक नियम तोडत रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याविरोधात राज्य सरकारने गुन्हे दाखल केले होते. अशातच संचारबंदी आणि जमावबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी अनेकांवरील गुन्हे आता राज्य सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही
कोरोना काळात नियम तोडत तरूण, विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांना उठ बशा तर अनेकांना लाटीचा प्रसाद दिला होता. यात अनेक विद्य़ार्थ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना भविष्यात नोकरीच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि इतर अडचणी लक्षात घेता गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली
त्यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. त्यात त्यांनी कोरोना संक्रमण काळात संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वतः घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर
दरम्यान, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थांना या गुन्हांमुळे विशेष अडचणी निर्माण होत होत्या. पासपोर्ट काढण्यापासून ते पोलीस व्हेरिफिकेशनपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोना काळात ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.
Read also:
- आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
- पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
- खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
- आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा