सोलापूर : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता शिवसेेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची जाहीर कार्यक्रमातून कानउघडणी करत जोरदार निशाणा साधला. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाराज असलेल्या नेत्यांची नाराजी दुर केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
तानाजी सावंत यांनी इतर पक्षांवर टिका करत म्हणाले की, आमचं याठिकाणी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी श्रद्धा आहे. आमच्याकडे आदेश चालतो आणि त्या आदेशाची वाट आमदार,खासदार, मंत्री किंवा शिवसैनिक असो प्रत्येकजण आम्ही आतुरतेने बघतो. आम्ही त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. विषयच नाही, कडवा शिवसैनिक ज्याच्या मनगटाच्या ताकदीवरती. त्याने कधी ऊन, वारा, पाऊस, किंवा काही साम, दाम, मिळते की नाही याचा विचार केला नाही.
आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली. तुम्ही त्यांच्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असं ठरलेलं असताना असं का होतं? आमच्या नादी लागू नका, तुम्ही 100 मारले आणि आमचा एकच दणकट बसला तर आईचं दुध आठवले असा इशारा देखील त्यांनी दिला. 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलंलं दाखवावं, मी आता आमदारकीचा राजीनामा देतो. विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो. की तुम्ही आमचं का वाकून बघताहेत. तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे. असंही ते म्हणालेत.
मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले
त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की, ज्या ठिकाणी दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असतात त्याठिकाणी खदखद होते. परंतु ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. राजकारणात असं थोडं मागे पुढे होत राहतं. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. सर्व खासदार, आमदारांशी चर्चा केली तर सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक मतदारसंघाला न्याय दिला आहे. एक दोन लोकांना जास्त मिळतं. काहींना कमी मिळालं असेल तर त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणालेत.
Read also:
- पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत
- सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
- कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर
- आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका
- आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;