भंडारा : राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना या तिन्हीं पक्षांवर विरोधी पक्षांकडून जोरदार टिकेचा मारा करत सरकार लवकरात लवकर कोसळेल असं वक्तव्य केलं जात आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीतील सरकार अजूनही स्थिर आहे. अशातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. तेव्हा ते भंडारा येथे माध्यमांशी बोलत होते.
मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले
राज्यात जे सत्तेचे पिपासू आहेत. त्यांची सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांची जी तडफड सुरू आहे. त्या तडफेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार काम करीत आहे. कोरोळा काळात हा त्यांना अजेंडा राबवता आला नाही. मात्र आता राबवणं शक्य असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
भाजपवर टिका करताना ते म्हणाले की, आम्ही चालवलेल्या समान कार्यक्रमांचा विरोधकांना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण केला जात आहे. पंरतु यांच्या काळ्या जादूचा काहीही फरक आमच्यावर फडणार नाही. त्यांची सत्तेची काळी नजर आहे. परंतु ती या सरकारवर त्या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल, अंसही त्यांनी यावेळी सांगितलं.
आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप
दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही अंधारात आहे. त्यावर बोलताना म्हणाले की, ओबीसींचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारकडील डाटा 98 टक्के अचूक आहे परंतु ते देत नाहीत. त्यासाठी राज्य सरकारची जाणूनबूजून अडवणूक केली जात असल्याची टीकाही केली.
Read also:
- कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर
- आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका
- आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
- आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा