मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वाक़युद्ध सुरू आहे. मागील काही दिवसात महाविकास आघाडी सरकारच्या तीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश आहे. अशातच आता याच सरकारमधील 2 मंत्री सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे वादात सापडले आहेत.
शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली
मुंबईतील एका कार्यक्रमात जाहीरपणे तलवार पकडल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि काही वेळातच गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंत्र्यांना खोचक सवाल विचारलाय. यापूर्वी जेव्हा मोहित कंबोज यांनी तलवार फिरवली होती तेव्हा त्यांच्यावर लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता काँग्रेसच्या या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार का ? असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केलाय. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना विनंती करतो की त्यांनी निष्पक्ष कारवाई करावी अन्यथा तुम्ही देखील इतरांसारखेच आहात हे सिद्ध होईल असं देखील कंबोज यांनी म्हटलंय.
ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर
याबाबत अस्लम शेख यांना या प्रकरणावरून विचारले असता त्यांनी कार्यक्रमात शीख समाजाने परंपरेप्रमाणे तलवार दिली. असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर अशा तलवारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही दिली आहे. परंतु आम्ही तलवार घेऊन लोकांमध्ये नाचलो नाही, दहशत नाही पसरवली किंवा तसला काहीही प्रकार केला नाही हा आमच्यातील फरक आहे, असं अस्लम शेख यांनी म्हटलं.
पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत
आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला घेरण्याचा हा भाजपचा प्लॅन असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपने जी काही व्ह्यूरचना आखली आहे त्यामध्ये भाजप यशस्वी होताना दिसत आहे. शिवसेनेचे यशवंत जाधव आणि इतरही पदाधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी गंभीर चूक केली आहे ज्याचा फायदा भाजपला पुरेपूर होणार आहे. त्यामुळे आणखी दोन नेत्यांवर जर गुन्हा दाखल झाला तर महाविकास आघाडी सरकारवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपला पुढील निवडणुकीत होणार का ? ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
- पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
- खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
- आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही