मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला काळी जादू म्हणत जोरदार टीका केली आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
आशिष शेलार यांनी नाना पटोले यांनी खोटं बोलणारी गुडीया म्हटलं आहे. खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले. ती गुडिया चावी दिली की बोलते. त्याला समर्थन आणि जनभावना कधी नसते असं म्हणत आशिष शेलार यांनी नाना पटोले यांच्यावर टिका केलीय. तर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणजे मुंबई नव्हे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. भ्रष्टाचार मुक्तीला राज्यातील जनतेचं समर्थन आहे. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घड्याळ प्रकणावरीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कडवड हिंदूने ते करू नये. आईच्या नावाने खोटं बोलणारी जमात वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर
आम्ही चालवलेल्या समान कार्यक्रमांचा विरोधकांना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण केला जात आहे. पंरतु यांच्या काळ्या जादूचा काहीही फरक आमच्यावर फडणार नाही. त्यांची सत्तेची काळी नजर आहे. परंतु ती या सरकारवर त्या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल, अंसही भाजपवर टिका करतांना नाना पटोले यांनी म्हटलं होतं.
आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका
राज्यात जे सत्तेचे पिपासू आहेत. त्यांची सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांची जी तडफड सुरू आहे. त्या तडफेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार काम करीत आहे. कोरोळा काळात हा त्यांना अजेंडा राबवता आला नाही. मात्र आता राबवणं शक्य असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
Read also:
- आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही
- शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली
- ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर
- पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत