मुंबई : आगामी काही दिवसात गुडी पाडवा आणि राम नवमी सण येत आहेत. राज्यात अजूनही काही प्रमाणावर कोरोनाचे नियम लागू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत देखील सणांबाबत भूमिका मांडली होती. मात्र येणाऱ्या या दोन सणांबाबत राज्य सरकारने अजूनही काही नियमावली जाहीर केली नाही. त्यावरुन आशिष शेलार यांनी राज्य सरकारला खोचक शब्दात सवाल केला आहे.
ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर
आशिष शेलार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जेव्हा जेव्हा राज्यात हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केला आहे. हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुका यांना परवानगी द्या, अशी देखील मागणी त्यांनी केलीय.
पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत
आशिष शेलार यांनी नाना पटोले यांनी खोटं बोलणारी गुडीया म्हटलं आहे. खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले. ती गुडिया चावी दिली की बोलते. त्याला समर्थन आणि जनभावना कधी नसते असं म्हणत आशिष शेलार यांनी नाना पटोले यांच्यावर टिका केलीय. तर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणजे मुंबई नव्हे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. भ्रष्टाचार मुक्तीला राज्यातील जनतेचं समर्थन आहे. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घड्याळ प्रकणावरीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कडवड हिंदूने ते करू नये. आईच्या नावाने खोटं बोलणारी जमात वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आंतकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी शक्यता वर्तवली आहे. ही माहिती पोलिंसांकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरूर घ्यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्यात आले आहे.
Read also:
- पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
- खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
- आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही
- शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली