मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या वेतनवाढीनुसार हा पगार जमा होणार आहे. ठरल्याप्रमाणे पगारवाढ आज खात्यात जमा केली जाईल अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
“बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
दरम्यान मेस्मा संदर्भात आज कुठलीही बैठक नाही, मेस्माबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीतच होणार असल्याची माहिती मिळत आहे, कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतर सरकार प्रत्यक्षात खात्यात किती रक्कम जमा करणार याकडे आंदोलनातील इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवेंद्रसिंहराजे की नितीन पाटील; शरद पवार कोणाला करणार अध्यक्ष?
विलिनिकरणाच्या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पगार वाढ केल्यानंतर देखील काही कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल 19 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. दरम्यान जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल,असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यामुळे आज कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
“नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळत नाही!”
कर्मचारी आता हळूहळू कामावर येऊ लागले आहेत. राज्यातील 250 पैकी 105 आगार सुरू झाले असून, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 19 हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. परब यांच्या आवाहानाला कर्मचारी चांगला प्रतिसाद देत असून, सोमवारी राज्यभरात एसटीच्या 1700 पेक्षा अधिक फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामधून एक लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.
Read Also :
- ‘ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकतं’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला तोडगा
- तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? विखे-पाटलांचा प्राजक्त तनपुरेंवर घणाघात
- बाळासाहेब ठाकरे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा; ‘या’ नेत्याने केली मागणी
- “व्हाया देवेंद्र फडणवीस सांगितलं की दिल्लीला जा आणि सुखी राहा”; राणे असं म्हणताच फडणवीसांनी जोडले हात
- “देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!”