अहमदनगर – वीज वितरणची थकबाकी भाजप सरकारमुळे वाढल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता यावर विखे-पाटील यांनी तनपुरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल तनपुरेंना विखे-पाटलांनी केला आहे.
सहावीला पिंपरी चिंचवडला आलो; ‘त्या’ पोस्टरने शहरात पुन्हा उडाली खळबळ
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतीचे वीज कनेक्शन कापू नये, वीजबिलं माफ करावी ही मागणी करत शेकडो आंदोलकांच्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकाच्या कारभारावर समाधानी नाही. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा, अशी मागणी करत सरकारला केवळ वसुली करायचं माहीत आहे. राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
एसटी कर्मचाऱ्यांसोबत सरकारने चर्चेची दारे केली बंद; आता संपकऱ्यांवर धडक कारवाईला सुरूवात होणार?
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहेत का? थोरातांना वसुलीतून वेळ मिळतो का? असा टोलाही यावेली विखे-पाटलांनी लगावला आहे. कोणतेही सरकार आलं तर शेतकऱ्यांना मदत गरजेची आहे. तुमची वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, अशी टीका विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या वीज तोडणीविरोधात शेतकरी आक्रमक झालेत, अनेक ठिकाणी मोर्चेही निघाले. पिकं ऐण भरात आली असताना शेतकऱ्यांना हातातोंडाला आलेली पिकं करपण्याची भिती आहे.
Read Also :
- बाळासाहेब ठाकरे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा; ‘या’ नेत्याने केली मागणी
- “व्हाया देवेंद्र फडणवीस सांगितलं की दिल्लीला जा आणि सुखी राहा”; राणे असं म्हणताच फडणवीसांनी जोडले हात
- “देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!”
- “नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळत नाही!”
- खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान