मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायला तयार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार आक्रमक पावले टाकत आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनी ‘मेस्मा’ लावण्याचे संकेत दिले आहेत. एसटी कर्मचारी ऐकायला तयार नसल्याने आता कडक कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे चेन्ने यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
“देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”; नाना पटोले यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
ते म्हणाले, “मेस्मा कायदा अतिशय स्पष्ठ आहे. राज्य सरकारला कायदा करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे संपाला मेस्मा कायदा लागू शकतो. आम्ही 9 हजार लोकांचे एकाच दिवशी निलंबन केलेले नाही. राज्य सरकारने कुणावरही तात्काळ कारवाई केलेली नाही. सरकारची कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका राहिलेली नाही. सरकार नुसतं कारवाई करत आहे, अशी परिस्थिती नाही,”
चेन्ने पुढे म्हणाले, “आता जे वेतन होईल त्यात किमान 9 हजारची वाढ झालेली आहे. इतकी वाढ कधीच झालेली नव्हती. आता कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जे कुणी अफवा पसरवत आहेत त्याला आम्ही उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मेस्मा ऍक्टमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की एसटी महामंडळ ही राज्य सरकारची सेवा आहे,”
देश विकणाऱ्या सोबत राहायचे की, देश वाचवणाऱ्या सोबत… विचार करण्याची वेळ
कर्मचाऱ्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करुन ते म्हणाले, “500 कोटींपेक्षा जास्त फटका आम्हाला बसला आहे. व्हाॅट्स अॅप आणि सोशल मीडियातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सरकार नेहमी म्हणत आलेल आहे की तुम्ही कामावर या. काही लोकांना कारवाईबद्दल देखील चुकीचे मार्गदर्शन केले जात आहे. संपामध्ये चर्चा झाली पाहिजे. इथे ज्यांच्याशी चर्चा करतो ते नेतृत्व राहत नाही. त्यामुळे चर्चा तरी कुणाशी करायची. चर्चेची सर्व दारे बंद झालेली आहेत,”
Read Also :
- बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
- अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती
- सहावीला पिंपरी चिंचवडला आलो; ‘त्या’ पोस्टरने शहरात पुन्हा उडाली खळबळ
- …तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी नारायण राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकला शड्डू