नागपूर : ‘सध्या देशाची जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली आहे की, त्यांनी देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
‘केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर देशात त्यांनी जी तबाही सुरू केली आहे, चीन अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून बसला आहे. दररोज देशातील एक-एक प्रॉपर्टी केंद्र सरकार विकत आहे. देशातील संविधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचं काम भाजपकडून होत आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य हे त्या देश विकणाऱ्या सोबत असल्याचं स्पष्ट होतं. म्हणूनच आजच्या ‘सामना’मधून ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली टीका ही देश हिताचं आहे.’ असं नाना पटोले यावेळी म्हणाले.
‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
दरम्यान, याचवेळी बोलाताना नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाबाबत देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार असून वेळेवर त्यांचे नाव जाहीर केले जाईल.’ अशी माहिती देखील नाना पटोले यांनी यावेळी दिली आहे.
राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष
दरम्यान, “ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढ्या सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न.” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Read Also :
- आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे? – फडणवीस
- ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..
- “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”
- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्यावरून दोन वकिलांमध्ये होणार संघर्ष; सदावर्ते विरुद्ध परब संघर्ष न्यायालयात होणार सुरु
- पुणे जिल्हा बँकेच्या रिंगणात तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री; वळसे-पाटलांचा देखील अर्ज दाखल