मुंबई : नाशिक येथे सुरु असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडत नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना टोला लगावत फडणवीस यांनी संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे.
भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट
94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरू आहे. या संमेलनाला देवेद्रे फडणवीस यांना निमंत्रित न करण्यावरून भाजपच्या नेत्यांनी संमेलन आयोजकांवर टीका केली होती. मराठी साहित्य संमेलनात आज (4 डिसेंबर) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार, अशी घोषणा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली होती. फडणवीस यांचा आज दुपारनंतर नाशिकमध्ये दौरा आहे. मात्र, या दौऱ्याआधीच त्यांनी साहित्य संमेलनाला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
संमेलन नगरीला दिलेल्या नावावरुन देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली आहे. ‘अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?’, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
‘नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का?’, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे.
त्यांना मी अभिवादन करतो.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच.
पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? #साहित्यसंमेलन— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2021
‘असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?’, असं म्हणत फडणवीस यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
Read Also :
- ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..
- “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”
- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्यावरून दोन वकिलांमध्ये होणार संघर्ष; सदावर्ते विरुद्ध परब संघर्ष न्यायालयात होणार सुरु
- पुणे जिल्हा बँकेच्या रिंगणात तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री; वळसे-पाटलांचा देखील अर्ज दाखल
- राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष