जालना : ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची गती जास्त आहे. मात्र त्याला घाबरण्याच काम नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना जे अनुभव आले त्यामुळे ओमायक्रॉनची दहशत वाटणं साहजिक आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.त्यामुळे संसर्गाची भीती वाटते. मात्र आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करा, मास्क काढू नये असं आवाहन टोपे यांनी यावेळी केले आहे. ते जालन्यात बोलत होते.
देश विकणाऱ्या सोबत राहायचे की, देश वाचवणाऱ्या सोबत… विचार करण्याची वेळ
कर्नाटकात आतापर्यंत फक्त दोनच रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले असून सध्या राज्यात निर्बंध किंवा लॉकडाऊन लावला जाणार नाही. निर्बंध लावले तर लोकांना ते त्रासदायक ठरतील असंही ते म्हणाले. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
12 वर्षावरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली असून केंद्राने याबाबतीत लवकर निर्णय घ्यावा. 5 वर्षाखालील मुलांना ओमायक्रॉनचा अधिक धोका आहे असं दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे यावर देखील टोपे यांनी भाष्य केले.
‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुलांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती फार चिंताजनक राहिली नाही मात्र लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 12 वर्षांवरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे असंही ते म्हणाले. लहान मुलांच्या टास्क फोर्सनं देखील त्यांना लसीकरणाची मागणी केंद्राच्या आरोग्य विभागाकडे केली असून यावर केंद्राने निर्णय घ्यावा असं सांगत राज्यातील ऑक्सीजन उत्पादकांना सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे टोपे म्हणाले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे. लहान मुलांना काय आवश्यक असेल त्याचाही आढावा घेऊन तयारी केली आहे.पण ही लाट येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 85 टक्के पहिला तर 45-46 टक्के दुसरा डोस नागरीकांना दिलेला आहे.त्यामुळे दुसरा डोस नागरिकांनी तातडीने घ्यावा टाळाटाळ करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Read Also :
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी नारायण राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकला शड्डू
- देश विकणाऱ्या सोबत राहायचे की, देश वाचवणाऱ्या सोबत… विचार करण्याची वेळ
- आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे? – फडणवीस
- ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..
- “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”