मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे मंत्रालयातून बाहेर पडले. त्यावेळी एका महिला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तु टिकली लावली नाही म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही. अशा पद्धतीचं उत्तर देत त्या महिला पत्रकारांशी बोलणं भिडेंनी टाळलं. त्यानंतर राज्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर आता शिंदे मंत्रिमंडळातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी या प्रकरणावर भाष्य़ करत एकप्रकारे त्यांनी भिडेंना समर्थन दिलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
जसं महिला पत्रकाराला टिकली लावली की नाही, हे स्वातंत्र्य आहे. तसचं भिडेंनाही ते व्यक्तिस्वातंत्र्य आहे. माझा बाईट घेण्यासाठी एखादा पत्रकार आला आणि मी त्याला अमुक तमुक रंगाचा शर्ट घालून आला तरच मी बोलेन असं सांगितलं, तर माझ्या स्वातंत्र्याचा तो मुद्दा आहे. हेच स्वातंत्र्य मग भिडेंनाही का नाही. ? असा उलट सवाल बच्चू कडू यांनी केला.
मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके
संभाजी भिडे यांची भूमिका योग्य की अयोग्य? असं थेटपणे सांगता येणार नाही. पण मला असं म्हणायचं आहे की, काही लोकांचा एक विशेष स्वभाव असतो. भलेही संभाजी भिडे यांचं म्हणणं समाजाला दिसायला चुकीचं दिसत असेल, पण त्यांच्या स्वभावाला ते चुकीचं वाटत नाही.पण आपण अशा गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा रूग्णालायामध्ये किती लोकं बिचारे आजारी आहेत? किती लोकांना मदतीची गरज आहे? अशा विषयावर चर्चा करायला हवी. हे टिकली प्रकरण मला फार महत्वाचं वाटत नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार
- “नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं
- “सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?
- शिंदे गटाचे 12 आमदार बाद होणार..! सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांची रणनीती, काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले..?
- “सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर