मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण संख्येने नवा उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र सरकारने लावलेले कडक निर्बंध आणि लसीकरण मोहिमेमुळे हा आकडा कमी होताना दिसत आहे. यावरून श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
रुग्ण संख्या वाढल्यास नागरिक जबाबदार आणि कमी झाल्यास प्रशासन अशी दुटप्पी भूमिका सरकार कसे घेऊ शकते ? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.
आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत .म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 11, 2021
संदीप देशपांडे म्हणाले की, आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे. त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात?, असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, रविवारी मुंबईत एकूण 2403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील 45 दिवसात अडीच हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा 6 लाखांच्या पुढे पोहोचला आहे.
Read Also :
- मुंबईसाठी आदित्य ठाकरे आले धावून…महापालिकेला केली ‘ही’ महत्त्वाची सूचना
- ‘मुंबईप्रमाणे पुण्यातही जेष्ठ, दिव्यांग नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन पध्दतीने लसीकरण करावे’
- ‘70 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिके मोफत लसीचा बोजा उचलावा’
- ‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लसीकरण करावे’
- म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची मोठी घोषणा