मुंबई – गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता बाबरी मशीद कोणी पाडली यावरुन भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमधील वाद भडकला आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईतील सोमय्या मैदानावर झालेल्या बुस्टर सभेत यावरूनच शिवसेनेवर टीका केली. बाबरी पडली त्यावेळी शिवसेनेचे नेते कोणत्या बिळात होते, असे म्हणत त्यांनी शिवसेनेसा डिवचले आणि बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता, असा घणाघात शिवसेनेवर केला.
यावर शिवसेकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडिओ आणि बाबरी पडली तेव्हाच्या सामना वृत्तपत्राच्या बातम्याचे कात्रणच ट्विट करत बाबरी कोणी पाडली? ऐका.. आणि आता बोला.. अब बोलो.., असे कॅप्शन देत फडणवीसांना पत्युत्तर दिले आहे.
फडणवीसांनी आपल्या भाषणात बाबरी पडली तेव्हा तिथे एकही शिवसैनिक तिथे नव्हता,असे म्हणत शिवसेनेला डिवचले होते. त्यांच्या या टीकेला राऊतांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणींचा एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर बोलतानाचा २९ डिसेंबर २००० चा व्हिडिओ ट्विट केला आहे.
बाबरी कोणी पाडली?
ऐका…. pic.twitter.com/cnBTWLLiMI— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2022
आता बोला..
अब बोलो… pic.twitter.com/V3yGl6kbqv— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2022
राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओत अडवाणी मुलाखत देतांना म्हणतात की, “बाबरी पाडणे ही खूप मोठी चूकी होती. यामध्ये काही शंका नाही. मी आधी उमा भारतींना तिथे पाठवलं आणि सांगितलं की, बाबरीवरील लोकांना खाली उतरवा. त्यांना सांगा की असे काही करु नका. जेव्हा त्या परतल्या आणि मला सांगितलं की मशिदीवर काही लोक आहेत आणि ते ‘मराठी’त बोलत आहेत. ते माझं ऐकत नाही. त्यानंतर मी प्रमोद महाजन यांना पाठवले. ते तिथे गेले. मात्र, तेही हताश होऊन परत आले. त्यांनंतर मी माझ्यासोबतच्या पोलिसांना सांगितलं की मला तिथे जायच आहे. पण, ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला त्याची परवागनी देऊ शकत नाही”.
‘तोंड आम्हालाही आहे.आम्हीही..” राज ठाकरेंना इम्तियाज जलील यांचा इशारा
या व्हिडिओमध्ये अडवाणींनी मराठी भाषिकांचा उल्लेख केला असून त्यावरुन तिथे मराठी लोक म्हणजे शिवसैनिक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न राऊतांनी केला आहे. तर, आणखी एक ट्विट करत राऊतांनी त्यामध्ये सामना वृत्तपत्राच्या बातम्याचे कात्रणांचे फोटो टाकले. यामध्ये ‘शिवसेना कार्यकर्ता बॉम्ब घेऊन अयोध्येला जाणार’, ‘शिवसेना प्रदेश प्रमुखांच्या घरावर छापा’, ‘खवळलेल्या हिंदू महासागराने रामजन्मभूमीचा ताबा घेतला’, अशा मथळ्याच्या बातम्यांचे कात्रण आहेत. या ट्विटला ‘आता बोला..’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!
- “महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका