बीड : बीडमध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, या प्रकरणाचे पडसाद आता मुंबईपर्यंत उमटू लागले आहेत. या प्रकरणात ज्यांच्यावर हल्ला झाला, त्या माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी, या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून, “साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा, ३० तारखेपर्यंत अप्पासाहेब जाधव यांची निवड रद्द करावी. नाहीतर, शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आत्मदहन करणार,” असा टाहो फोडला आहे.
शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर
त्यांनी, यासंबंधी एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला असून, त्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबोधून अशी मागणी केली आहे. तसेच, या असायचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे.
संजय राऊतांची ही सवयच, “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”
बीड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी मागच्या आठवड्यात, अप्पासाहेब जाधव यांची निवड झाल्यापासून या वादाला सुरुवात झाली असून, आता हा वाद विकोपाला गेला आहे. सुरुवातीला जाधव यांच्या निवडीचा निषेध करुन, नंतर मिरवणूकीत जाधव यांच्या गाडीवर शाही फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्री. सोळंके यांना, जाधव यांच्या भावासह समर्थकांनी भर रस्त्यात चाबकाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात गुन्ह्याची नोंद पोलिसांकडून झाली असून, यामुळे बीड जिल्ह्यातील शिवसेनेतील दुफळी समोर आली आहे.
“लेकीनेही बापाच्या कामाचा विचार करून, त्याच्या कामाची जाण ठेवली पाहिजे”
“माझा टाहो शिवसेना वाचावी, शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक वाचावा यासाठी आहे. तुम्हाला विचारुन हा निर्णय झालेला नाही, मातोश्रीआडून संपर्क प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे,” असे सांगत त्यांनी यात आनंद जाधवांचे नावही यात घेतले आहे. “मला शिवसेना भवनावरुन हाकलून दिले, म्हणून नाईलाजने हा व्हिडीओ शेअर करावा लागत आहे,” असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.
पुणे महापालिकेने दिलेले २०० कोटी गेले कुठे?, ED, CBI चौकशी करा – सुप्रिया सुळे
दरम्यान, अप्पासाहेब जाधव ३ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले असून, दीड वर्षांपूर्वी तालुका प्रमुख झाले. ६ शाखांपेक्षा त्यांनी शिवसेनेत काहीही काम केले नाही. ना नव्या शिवसैनिकांची जोडणी केली ना जुन्यांशी संबंध ठेवला, तरीही त्यांची निवड होत असेल तर खऱ्या शिवसैनिकांवर हा अन्याय आहे, ही घटना आणि त्यांची निवड अनाकलनीय आहे. शिवसेनेत अनेक निष्ठावंत शिवसैनिक काम करत आहेत. मी कायम जगेन, तर शिवसेनेसाठी आणि मरेनही ते शिवसेनेसाठीच,” असेही त्यांनी पत्रात आणि व्हिडिओत म्हटले आहे.
Read Also :
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- ‘सर्वकाही मनाप्रमाणे होईल, पण संन्यास घेऊ नका’, फडणवीसांवर सामनातुन खोचक टीका
- टीकेचं विष प्राशन करुन ओबीसींना आरक्षण मिळत असेल, तर आमची तयारी आहे; पंकजा मुंडे म्हणतात…
- ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
- विजय वडेट्टीवार म्हणजे काँग्रेस पक्षातील असंतोषाचे मुर्तीमंत उदाहरण; प्रविण दरेकरांची खोचक टीका