मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर, भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. त्यात आता काँग्रेस नेत्यांचीही भर पडणार असल्याचे सूतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांच्यामागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केला. त्यांनतर लगेचच पाटील यांनीही परिषद घेऊन मुश्रीफांना सडेतोड उत्तर दिलं आणि त्यांनतर एक खळबळजनक विधान देखील केलं.
किरीट सोमय्यावर गृह मंत्रालयाची कारवाई, मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही – संजय राऊत
‘चंद्रकात दादांनी मला भाजपत यायची ऑफर दिली. पण मी ती नाकारली. त्यानंतरच या आयकर विभागाच्या धाडी झाल्या,’ असा दावा मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर, ‘मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्याने ती नाकारली, तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याची आमची संस्कृती नाही. त्यांनी हे सगळे नाटक बंद करावे आणि कायद्याची लढाई कायद्याने लढावी,’ असा सल्ला पाटीलांनी दिला.
भाजपात प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटीलांनी मला ऑफर दिलीयं; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
तसेच, ‘घोटाळ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचेच आमदार सापडत आहेत, असं काहींना वाटतंय. पण आता दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोनच दिवसात त्यांचेही विषय समोर येतील,’ असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवर असलेले काँग्रेसचे हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात असून, त्या अनुषंगाने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्या केसालाही धक्का लावला तर दुसऱ्या दिवशी सरकार पाडेल – सोमय्या
दरम्यान, ‘कोल्हापूरला जाऊन मुश्रीफ यांचे आणखीन काही घोटाळे बाहेर काढणार,’ असे म्हणणाऱ्या सोमय्या यांना, पोलिसांकरवी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेला. त्यांनतर या कारवाईला झुगारून त्यांनी रेल्वेने कोल्हापूर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कराडमधेच गाठून थांबण्याची विनंती केली. त्यांनतर सोमय्यांनी कोल्हापूरचा दौरा रद्द केला आणि कराडमध्येच पत्रकार परिषद घेऊन लवकरच मुश्रीफ यांचा तिसराही घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले.
Read Also :
- किरीट सोमय्याला कराडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात; रेल्वे स्थानकावर केली कारवाई
- राज्यात लोकशाही संपली? फक्त आणीबाणी घोषीत करायची राहिलीये!
- सोमय्यांवरील कारवाईनंतर भाजप नेते आक्रमक, कोल्हापूर दौरा होणार?
- *४ दिवस-४ दौरे, सोमय्या करणार ‘या’ नेत्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?
- भाजप सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही!