नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. अशातच शांतिगिरी महाराजांनी देखील दंड थोपडल्याने श्रीकांत शिंदेंनी गोडसेंची उमेदवारी जाहीर केली आहे. यातच आता शांतिगिरी महाराज यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार
नाशिकच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचे काही दिवसापासून दिसून येत आहे. अशातच शांतिगिरी महाराज यांनी देखील निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे आपला पत्ता कट होणार का ? अशी शंका विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना येऊ लागली आहे. यातच काल कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गोडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”
शांतिगिरी महाराज म्हणाले की, सध्या निवडणुकीचे वारे संपुर्ण देशात सुरू झाले आहेत. त्यामुळे आमच्या जय बाबाजी भक्त परिवाराने संकल्प केला आहे की या लोकशाहीमध्ये नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवायची. त्यानुसार आमचे सर्व जयबाबाजी भक्त परिवार सहभागी झाले आहेत. लोकशाही आहे, त्यामुळे यामध्ये कितीही उमेदवार उभे राहू शकतात. त्यामुळे आमच्या लढा संघर्षाचा आणि हेतू शुद्ध राजकारणाचा याच्या माध्यमातून जोमाने कामाला लागले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत नाशिकच्या जागेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने दावा सांगितला आहे. त्यात शांतिगिरी महाराज यांनी देखील निवडणुक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे. तसेच येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“सातारा आपलाच, कामाला लागा,” अजित पवारांनी लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…“मी कॉंग्रेसची, अन् कॉंग्रेसच्याच तिकीटावर निवडणुक लढणार”, चंद्रपुरात कॉंग्रेसमध्येच पेच वाढला
हेही वाचा..श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, महायुतीत पेच वाढला, भाजप काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…“राष्ट्रवादीकडून श्रीरंग बारणेंची कोंडी, मावळवर राष्ट्रवादीचा दावा, कार्यकर्ते सरसावरले”
हेही वाचा…“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले