नवी दिल्ली : केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. आता या पत्राची दखल घेत सदानंद गौडा यांनी शरद पवारांना फोन करून दरवाढीचा पुनर्विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
शरद पवार यांनी पत्रातून देशातील कोरोनाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकटाची माहिती दिली होती. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं होते.
शरद पवारांच्या या पत्राची दखल घेत गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती पवार यांनी केली होती.
सदानंद गौडा यांनी पवारांना पत्र करून पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासित केले आहे.
Read Also :
- राजीव सातव यांना श्रद्धांजली सभेचं आयोजन, काँग्रेस नेते झाले भावूक
- ‘गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर!’
- ‘युट्यूबकडून मिळतात ‘इतके’ पैसे’, गडकरींनी सांगितला आकडा
- ‘बार्जमधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार’
- ‘मोदी गुजरात तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा’