मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडण्याच्या तारखा भाजपकडून जाहीर करण्यात येत असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठं विधान केलं आहे. शरद पवारांनी खाजगीत केलेल्या एका चर्चेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी आघाडी सरकारबाबत विधान केलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील. तसं पहायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फारसं अंतर नाहीये. पुण्यात शरद पवरांनी आपल्या मित्रांसोबत बोलताना सांगितलं… एक खाजगीतलं सांगतोय, शरद पवार म्हणाले, 2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील.”
शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
कुठल्याही गोष्टीत शरद पवार हे उद्धव ठाकरेंवर दबाव टाकतायत असं मी कधीही बघितलं नाही. त्यांचं असंस म्हणणं असतं की, शरद पवार हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य करावेच लागतील. तो मुख्यमंत्रिपदाचा जो आदर आहे तो दिलाच पाहिजे. त्याच दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील वॉर्ड रचनेवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाण्यात सत्ताधारी शिवसेना मनमानी करते. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वॉर्ड रचनेत बदल केले. आपल्या सोईनुसार शिवसेनेने वॉर्ड रचना केली असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
Read Also :
- भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
- पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
- कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार