जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली आहे. आज खासदार संभाजी राजे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. त्यावेळी दोघांनी व्यासपीठावर एकत्रित जरांगे पाटलांची भेट घेतली.
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा
राज्यातील मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला. त्यांच्याशी बोलणं झालं. एका ठराविक दिवसात प्रश्नांची तड लावण्याचं ठरलं. काही चर्चा झाली. आश्वासने दिली. दुर्दैवाने जे काही ठरलं होतं. त्याची अंमलबाजावणी झाली नाही. त्यामुळे मनोजने निर्णय घेतला. आपण समाजासाठी पडेल ती किंमत द्यायची आणि त्यासाठी उपोषणाचा कार्यक्रम घेतला. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी काल सर्व माहिती घेतली. मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला पोलीस आले. त्यांनी बोलणी केली. एका बाजूला चर्चा सुरू केली आणि दुसऱ्या बाजूने पोलीस मोठ्या संख्येने आणले गेले. चर्चा चालू असतांना एका बाजूने बळाचा वापर करून काही लोकांवर लाठी हल्ला केला. बळाचा वापर केला. एवढचं नाही तर हवेत गोळीबार केला. त्याशिवाय अलिकडच्या काळात बंदूकीतून छर्रे वापरतात. त्या छऱ्याचा मारा केला. मी रूग्णालयात गेलो. काही लोक असे होते त्यांच्या अंगावर छर्रे मराले गेले. छोट्या छोट्या गोळ्या मारल्या गेल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांच्या पुतळ्याचे दहन, आमदार, खासदारांना फिरू न देण्याचा इशारा”, मराठा आरक्षण पेटलं
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण