जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध करत मोर्चाही काढण्यात आला.
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सरपंचांनी स्वत:चीच गाडी पेटवली. फुलंब्रीचा सरपंच मंगेश साबळे यांनी हा प्रकार केला आहे. भर रस्त्यात गाडी आडवी लावत पेट्रोल टाकून गाडी त्यांनी पेटवून दिली. आंतरवाली गावात झालेल्या लाठीचार्जच्या निषेध म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं आहे. यातच संभाजी ब्रिगेड आक्रमक झाला आहे. सर्व मराठा आमदार, खासदारांना फिरू न देण्याचा इशारा दिलाय.
हेही वाचा…“फडणवीस क्रूरतेच्याबाबतीच मोदी आणि शहांनाही मागे टाकताहेत, अगोदर ‘वारकरी’ अन् आता ‘मराठा बांधव’”
दरम्यान, सोलापूरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आलीय. जालना येथील घटनेनंतर एसटी बसेसवर झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनानंतर खबरदारी म्हणून सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद करण्यात आलीय. राज्य परिवहन मंडळाच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याकडे जाणाऱ्या ५४ फेऱ्या सकाळपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा