पुणे : काल राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून देणारी राजकीय घडामोड घडून आली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेली ईडीची छापेमारी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यापर्यंत आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे.
शेल कंपनीच्या मालकांनी पाटणकरांना विनातारण ३० कोटी रुपये दिल्याचा आरोप श्रीधर पाटणकर यांच्यावर आहे. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एन्ट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचं कर्ज साईबाबा गृहनिर्मीती प्रा.लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं गेलं, असा आरोप ईडीने ठेवलेला आहे.
शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
श्रीधर पाटणकरांच्या नीलांबरी प्रकल्पातील ठाणे येथील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. साडे सहा कोटींच्या मालमत्तेवर आतापर्यंत टाच आण्यात आलेली आहे आणि कारवाई सुरु आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊतांसहित थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर टीकांचा भडीमार केला आहे.
13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला
केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाया म्हणजे कोणाला तरी मुद्दामून त्रास देण्याचा प्रकार आहे असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ईडीच्या कारवायांचा आलेख हा गेल्या काही दिवसांपासून चढता आहे. ५ ते १० वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर ईडी नावाची कोणती तरी केंद्रीय तपस यंत्रणा आहे हे कोणालाही माहित नव्हते. मात्र सध्या केंद्रात सत्ता असल्यामुळे आता कुणाला तरी टार्गेट करायचं, कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, आता ही ईडी गावागावात गेलीय, अशा शब्दात पवारांनी ईडी खिल्ली उडवली आहे.
Read also:
- उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
- तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
- उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा
- ”ज्यावेळी माझ्याकडून जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास ”; मुंडे भाऊबहिण आमनेसामने
- RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?