मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी उसाला दर नाही म्हणून थेट विधानभवन परिसरात आंदोलन केलं. त्यावेळी गोपीचंद फडळकर यांनी ठाकरे सरकारवर चांगलाचं निशाणा साधला. पवार कुटुंबीयांनी 13 सहकारी साखर कारखाने हटप केल्याचा आरोप देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर लावला आहे.
“२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी झाल्याचा आरोप करत, त्यातील 13 सहकारी साखर कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले आहेत. त्यामुळे या विषयावर ते काही बोलु शकत नाहीत. अजुन काही सहकारी साखर कारखाने हटप करायाचे आहेत, परंतु सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत म्हणून हे जरा दबुन बसलेले आहेत. सगळ्यांचा डोळा कारखाना बंद पाडायचा, त्यांचा लिलाव काढायचा 400 कोटी कारखाना 10 कोटीला, 300 कोटीचा कारखाना 5 कोटीला असले उद्योग यांचे चालू आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
एक रकमी एफआरपी देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश असताना केंद्र सरकारच्या नावाने बोंब मारली. केंद्र सरकारनेचे सांगितलं की दोन टप्प्यात दिलं पाहिजे. पंरतु सदाभाऊ खोत यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटल्यावर अशा प्रकारे पत्र व्यवहार न झाल्याचे कळून आलं. त्यामुळे एक रकमी एफआरपी द्या, 14 दिवसांच्या आत पेमेंट द्या. जो राज्यात अतिरिक्त ऊस उत्पादन झालं आहे. त्याबाबत प्रशासनाला आदेश द्या . जो पर्यंत उस उचलला जात नाही. तोपर्यंत हंगाम चालू ठेवा. जर यातूनही उस शिल्लक राहिला तर सरकारने याची जबाबदारी घ्यावी. एकरी पन्नास हजार रूपयांचं अनुदान द्यावं.
नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्यांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं पेटललं दिसुन येत आहे. त्यातच आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी उसाला योग्य दर मिळत नसल्याने आंदोलन सुरू केलं आहे.
Read also:
- मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याने माझा छळ; एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
- आपची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर ; मात्र मराठी अभिनेता संदीप पाठकची प्रतिक्रिया व्हायरल
- सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का
- उसाला दर नाही म्हणून विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन
- “कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश