कोल्हापूर : उत्तरेत विधानसभा पोटनिवडणुकीत कमालीच्या घडामोडी मागील दोन-तीन दिवसांमध्ये घडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेने देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
आता जरी शिवसेना पदाधिकारी जयश्री जाधव यांचा प्रचार करत असले तरी पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष ताकदीने कोल्हापूर उत्तरेत आपला झेंडा फडकवेल असे मनसुबे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी काल मूंबईत झालेल्या बैठकीत बोलून दाखवले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री उदय सामंत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.
33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
ज्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती त्यावेळी काही गोष्टी या ठरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी पक्षाचा ,आमदार वारल्यास त्याठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे, तेथे तोच राहणार असल्याचे ठरवण्यात आले होते. ही जागा काँग्रेसची असली तरीही महाविकास आघाडी म्हणून ती लढविली जात आहे. त्यामुळे कामाला लागा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागरांना दिले आहेत.
मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
या आदेशानंतर आता कोल्हापूर उत्तरेत शिवसेना ऍक्टिव्हेट झाली असून शिवसेनेकडून महाविकास आघडीच्या प्राचारला सुरुवात करण्यात आली आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे स्वतः मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
Read also:
- “२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
- उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
- नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
- ” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “
- नवाब मलिकांना अजून एक न्यायालयाचा दणका; दिलासा नाहीच