मुंबई : मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात आणि शिवसेनेत कमालीचा संघर्ष बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या विरोधात वारंवार नारायण राणे मोठे मोठे गौप्ह्यस्फोट करत आहेत. पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलणे असो किंवा दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेनेच्या एका मंत्र्याला अडचणीत आणणे असो, नारायण राणे आणि पुत्र नितेश राणे हे वारंवार शिवसेनेला डिवचत आहेत.
मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याने माझा छळ; एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतील सत्तेचा वापर करून शिवसेनेनं नारायण राणे यांचा जुहू येथील अधिश बंगला पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कारवाईचे आदेश देण्यात येण्यात आले होते. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या एका पथकाने अधिश बंगल्यात जाऊन चौकशी देखील केली होती आणि मोजमापही केले होते.
आपची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर ; मात्र मराठी अभिनेता संदीप पाठकची प्रतिक्रिया व्हायरल
नारायण राणे यांनी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने आज यावर सुनावणी घेतली आणि तूर्तास तरी बंगला न पाडण्याचे आदेश उच्च न्यायालायने दिले आहेत. यामुळे राणे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय झाल्यानंतर नितेश राणे यांनी लगेचच शिवसेनवर टीका केली आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांची कामे अत्यंत सुरळीत सुरु आहेत, सगळी कामे उरकून झाली आहेत त्यामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना राणेंच्या मागावर सोडते आहे.
सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का
वारंवार शिवसेनेकडून राणे कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे. आज जरी त्यांची सत्ता आली असली तरी देखील त्यांनी लक्षात घ्यावं की असा इशारा देखील नितेश राणे दिला आहे. आज पण संबंधित एपिपींना सुनावणी सुरु असताना कोणत्या सेनेच्या नेत्यांचे फोन येत होते ? हे देखील एकदा बघावं लागलं असं देखील राणेंनी म्हटलं आहे.
Read also:
- ”ज्यावेळी माझ्याकडून जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास ”; मुंडे भाऊबहिण आमनेसामने
- RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?
- ”..तर मी त्यांच्याशिवाय आघाडीत राहीन ”; स्वाभिमानी संघटनेच्या एकमेव आमदारांचा राजू शेट्टींना घरचा आहेर
- शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
- 13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला