सातारा : गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या सातारा लोकसभेतून भाजपचे माजी खासदार उदयन राजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयन राजे असा सामना रंगणार आहे. त्याआधी विरोधकांनी शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यावर आता शशिकांत शिंदे यांनी पलटवार केलाय.
हेही वाचा…“ही निवडणुक गावकी-भावकीची नाही, तर…” आढळरावांनी काढला कोल्हेंचा चिमटा
शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या घोटाळ्यावरून विरोधकांनी आरोप केले आहेत. यामध्ये माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आरोप केले होते. त्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या घोटाळ्याचा उल्लेख विरोधक करतात, त्याचा आणि माझ्यासह बाजार समितीतील संचालकांचा काडीमात्र संबंध नाही. ऐन लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने जनता उभी राहिलीय. हे पाहून विरोधकांनी षडयंत्र रचून माझ्यावर बेछुट आरोप केले आहेत. असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
राजकारणात आव्हान देणारा नेता सर्वसामान्य लोकांना ‘भावत’ असतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी माझ्यावर कितीही बिनबुडाचे आरोप झाले तरी मी क्षणभर सुद्धा थांबणार नाही. अखंड आणि अविरत जनसेवेत राहील! माझा समाजकारणासह ‘राजकारणात उधळलेला वारू’ इथली ‘कोणतीही मानसिकता’ रोखू शकणार नाही, हे शाश्वत सत्य आहे. असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…नाशिकमधून भुजबळांची माघार, ना गोडसे, ना दिनकर पाटील, भाजपच्या ‘या’ नेत्याची चर्चा
तर सातारा लोकसभेची निवडणूक आता सर्वसामान्य लोकांनी हाती घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात गाठीभेटी घेत आहे. उस्फूर्तपणे लोकांचा, तरुणांचा, माथाडी कामगारांचा, महिला भगिनींचा निवडणुकीतला सहभाग, बैठकीचा प्रतिसाद पाहता जनसामान्यांचा उठाव झाल्याचे निदर्शनास येते. सातारा लोकसभेची निवडणूक आता सर्वसामान्य लोकांनी हाती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात झालेली पक्षफोडी, स्वायत्त यंत्रणांचा विरोधकांवर वापर पाहता लोकांना प्रचंड प्रमाणात याविषयी चीड आहे. असंलं सत्तेचं राजकारण आजवर जनतेनं पाहिलं नव्हतं. केवळ सत्तेसाठी कोणत्याही थराला गेल्याचे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट “, लातुरमधून बाळासाहेब थोरांताचा हल्लाबोल
हेही वाचा…“अर्चना पाटील या देखील घरातलीच सुन”, धाराशिवच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला