नागपूर : मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन दिले. मराठा आरक्षणावर जवळपास सभागृहात १७ तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन पुन्हा चर्चा करण्यात येईल. असं म्हटलं. त्यावर आता विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टिका केली जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार घणाघात चढवला.
हेही वाचा…मराठा आरक्षणाच्या विषयासाठी एकूण ३० बैठका ; मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं तर मुख्यमंत्री आजच स्पष्ट बोलले असते. ज्या अर्थी त्यांनी कुठलीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. ठोस आश्वासन दिलं नाही. जुना इतिहास त्यांनी सभागृहात बोलून दाखवला. त्यावरून त्यांना काही कारायचं काही दिसत नाही. कोर्टात क्युरिटिव्ह पिटीशन केव्हा दाखल करणार ? यातच आरक्षणाची ५० टक्क्याची क्षमता कधी शितील करणार ? असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
हेही वाचा…मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन ; आतापर्यंत सरकारने काय काम केलं ?
इंद्रा साहनी केसची मर्यादा कशी राखली जाणार ? केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत काही बोलत नाही. ५० टक्क्याची मर्यादा काढण्याबाबत काही बोलत नाही. मागच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या समितीमध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मग त्यांनी त्यावेळेस का काही बोलले नाही. ? असा पलटवार देखील अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
READ ALSO :
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
हेही वाचा…“बाळासाहेबांना विचारलं तर कमरेत लाथ बसेल”, भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान, दानवेंनी घेतला समाचार
हेही वाचा…भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी १४१ खासदार निलंबित”
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा विषय फेब्रुवारीपर्यंत लांबला ; विशेष अधिवेशन होणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिला इशारा
हेही वाचा…“तर 2024 ला मी मुख्यमंत्री होऊ शकतो”, बच्चू कडूंच्या दाव्याने अनेकांची उडाली भंबेरी