मुंबई : जागावाटपावरून सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात खेचाखेची सुरू असलेल्या लोकसभेच्या तिन्ही जागा आपल्याकडे खेचून आणण्याच्या असतील तर सोबतच्या उर्वरित पाचही खासदारांचे मतदारसंघही राखायचे असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत: कडे किमान १६ जागा खेचून आणाव्या लागतील. त्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्यावर त्यागाची वेळ येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा…“..अन्यथा पुण्यात लोकसभेचं काम करणार नाही,” पुण्यात ठाकरे गट आक्रमक, धंगेकरांच्या अडचणीत वाढ
रत्नागिरी-सिंधुदूर्गची जागा जवळपास भाजपला गेली असे मानले जात आहे. आपला गड असलेला ठाणे ही जागा आपल्याला मिळावी असा त्यांचा आग्रह आहे. मात्र भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. नाशिकमध्ये शिंदे गट अन् अजित पवार गट उमेदवारीसाठी एकमेकांशी भिडले आहेत. त्यात ही जागा खेचून नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
हेही वाचा…लक्षद्वीपमध्येही घड्याळ चिन्ह वापरता येणार ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट लक्षद्वीपमध्ये आमनेसामने
शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, सदाशिव लोखंडे, धैर्यशील राव माने, संजय मंडलीक, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर विद्यमान खासदार असलेले भावना गवळी, हेमंत गोडसे, गजानन किर्तीकर, राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे अजूनही उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळणार का ? याबाबत मोठी शंका उपस्थितीत केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटातील उमेदवारांची नावे जाहीर होणार ; शरद पवारांचे ‘दहा’ शिलेदार लोकसभेसाठी तयार
हेही वाचा…नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी भारती पवारांच्या विरोधात ठोकला शड्डू ; दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट !
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी
हेही वाचा…“राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही”, बच्चू कडूंचा राणांच्या विरोधात लढण्याचा निर्णय पक्का
हेही वाचा…“तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी ;” राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंवर घणाघात