मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता पर्यंत सर्वपक्षीय २३८ आमदारांनी मतदान केलं असून त्याचा निकाल आज सांयकाळी लागणार आहे. राज्यात गेल्या २४ वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणुक ही बिनविरोध होत असल्याने राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. यावर आता शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात भाजप सध्या अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु जनता हे सर्व पाहत असून त्यांना जनताच धडा शिकविल, असं जाधव म्हणाले. त्याचबरोबर या निवडणुकीत १०० टक्के मतदान होईल, असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला. बहुजन विकास आघाडीसारखे छोट्या पक्षाचे आमदार सोडले तर जवळजवळ सगळे आमदार विधिमंडळात पोहचले असल्याचंही ते म्हणाले.
“उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
महाविकास आघाडीचे चारही उमेदवार पहिल्या पसंतीमध्ये निवडून येतील. त्यामुळे हवेमध्ये उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी जमिनीवर येईल, अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी भाजपवर केली आहे. भाजपचे लोक काहीही वक्तव्य करत असतात त्याचबरोबर एमआयएम ने कोणाला पाठिंबा दिला आहे. हे माहित नाही. तसेच त्यांनी याबाबत काय ट्विट केलं आहे. ते मला माहित नाही, असंही ते म्हणाले.
इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात मोठी चुरस बघायला मिळणार आहे, कारण भाजपकडून अतिरिक्त उमेदवार म्हणून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अनिल बोंडे, पियुष गोयल, तर शिवसेनेकडून संजय राऊतांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल पटेल, आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
Read also:
- आघाडीला मोठा धक्का ; राज्यसभा निवडणुक मतदानासाठी मलिक, देशमुख यांना दिलासा नाहीच
- “निजामाची औलाद एमआयएमची मदत घेऊन शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघड पडलं”
- एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
- राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; दीड तासात 143 आमदारांनी केलं मतदान
- व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग