मुंबई : मुंबई महापालिकेसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सोबत घेऊन चालायचं ठरवलं होतं. मात्र गेल्या सहा महिन्यापासून राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर यांची काल पत्रकार परिषद पाहिली आहे. त्यामुळे त्यांची युती नेमकी कोणत्या निवडणुकांसाठी झाली आहे. त्यासंदर्भात अद्याप स्पष्ट केलेली नाही. परंतु राष्ट्रवादीला ज्या जागा मिळतील त्यामध्ये त्यांच्या मित्रपक्षांना सामावून घ्यावं. तसंच इतर पक्षांना मिळालेल्या जागांमधून शिवसेना, आणि काॅंग्रेसनेही त्यांच्या मित्रपक्षांना सामावून घ्यावं. हे सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसदर्भात होतं. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. तसंच त्यांनी वंचित अन् शिवसेना युतीबाबतही भाष्य केलं आहे.
तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसदर्भात राष्ट्रवादीची मानसिकता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची आहे. मुंबईत पक्ष आणि संघटना म्हणून शिवसेना मोठा आहे. त्यामुळे त्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. असंही अजित पवार यांनी सांगितलं. तसेच राज्यपालांबाबत बोलतांना ते म्हणाले की, ज्यांनी त्यांना राज्यपाल म्हणून याठिकाणी पाठवलं आहे. त्यासंदर्भात त्यांनीच निर्णय घ्यावा. अन् त्यामुळेच त्यांच्याकडे त्यांनी आपली इच्छा प्रकट केली आहे. त्याचबरोबर वरिष्ठांनी काय निर्णय घ्यावा. त्यांना कुणीच सांगू शकत नाही. असंही त्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे. हे सर्व पत्रकार परिषदेमधून समजलं आहे. त्यामुळे आज सायंकाळी माझ्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असून त्यांची बाजू समजून घेऊ. त्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू. मात्र त्यांच्या युतीसंदर्भात आमची सकारात्मक भूमिका असणार आहे. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली असून त्यात चर्चा झाली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांसोबत चर्चा करून आमचा अंतिम निर्णय प्रसार माध्यमांना सांगणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील प्रमख पक्षांतील इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन आम्ही या पोटनिवडणुका लढविणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Read also
- इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
- काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
- “शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
- मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
- “माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं