मुंबई : वंचित आणि शिवसेना युतीचा फारसा काही परिणाम होणार नाही. कारण ही आघाडी केवळ भाजपला विरोध म्हणून झाली आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकर आणि त्याला शिवसेना यांच्या विचारात खुच अंतर आहे. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं, तेव्हा भाजपने त्याला पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता. असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
“संजय राऊतांची आज पुन्हा कोर्टवारी….!” आज कोर्टात महत्वपुर्ण याचिकेवर सुनावणी
काल उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषदेत झाली. या पत्रकार परिषेद शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीची घोषणा काल दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधलाय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटतं जनतेला हे समजतं. प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाहीत. आता त्यांना असं वाटतं की शिवसेना बरोबर आली तर कदाचित हिंदुत्ववादी मंत आपल्याबरोबर येतील. मात्र, त्यांना माहिती नाही की, हिंदुत्वादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली आहे.
Read also
- मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
- “माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
- “राजकारण सोडून दे, नाहीतर पेट्रोल पंपावर जाळून टाकू, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन”,; करूणा मुंडेंची तक्रार
- भारतीय जुमला पार्टीचे प्रत्येक पाप जनतेपर्यंत पोहचवा..! काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरूवात
- मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी…! मंत्रिमंडळाबाबत खलबत्त, बंडखोर आमदारांमध्ये नवचैतन्य