मुंबई : गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया आज कोर्टात केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सर्व आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे याकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
मला राज्यपाल पदापासून मुक्त करा..! भगतसिंह कोश्यारी यांची नरेंद्र मोदींकडे मागणी
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांना याप्रकरणी अटक देखील करण्यात आली होती. त्यांना 100 पेक्षा अधिक दिवस तुरूंगात डांबण्यात आलं होतं. त्यातच आज या प्रकरणातील सर्व आरोपींची आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस जारी कऱण्यात आली आहे.
…त्यामुळेच शिवशक्ती अन् भीमशिक्ती एकत्र आली..! उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात संजय राऊतांविरोधात याचिका दाखल केली होती. संजय राऊतांविरोधात त्यांनी अब्रुनुकसानीविरोधात याचिका दाखल केली होती. त्याविरोधात देखील आज कोर्टोत सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज दोन्ही घटनांकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य
दरम्यान, गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रूपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भुखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. यात संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत, आणि इतर जणांचा समावेश असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
Read also
- “उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात अथवा भाजपात गेलेत तर नवल नाही”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
- “कसबा पेठ मतदार संघ काॅंग्रेसकडे आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार”
- “घटनाबाह्य जितक्या कृती केल्या, त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही”
- “काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीही सोबत येतील, त्यांच्याशी आमचं फक्त मुद्यांचे भांडण”; प्रकाश आंबेडकर
- “महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदींची भूमिका”