मुंबई : आता जे भाजपचं सरकार आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेतृत्वाची एक फळी कापून टाकली आहे. भाजपला सध्या मित्र आणि शत्रूही नको झाले आहेत. यातच देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे जातांना दिसत आहे. जे आम्हाला पाहिजे आहे, ते आम्ही करणार अशी प्रवृत्ती सध्या दिसत असून यांचा बिमोड करण्यासाठीच आमची युती असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज आंबेडकर भवन याठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
“पोटनिवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा”
महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहेत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रूढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सध्या राजकारणात ज्या वाईट रूढी पंरपरा सुरू तो त्या मो़डून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशीही प्रतिक्रिया ठाकरेंनी दिलीय.
“पंतप्रधान पदासाठी संजय राऊत अन् राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पहावी”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अन् वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू म्हणूून वंचित बहुजन आघाडी सहभाग होेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसकडून या युतीबाबत अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीला सामावून घेण्याची कोणाचीही हरकत नसणार असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Read also
- “कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य
- “शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक”; काॅंग्रेसकडूनही हिरवा कंदील
- “बाळासाहेबांना शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही”; केंद्रीय मंत्र्यांची व्यक्त केली खंत
- अखेर भीमशक्ती अन् शिवशक्ती युतीची घोषणा..! महाविकास आघाडीत चौथा भिडू..
- “बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अजून बरचं काही घडणार”, शिवसेनेकडून सुचक वक्तव्य