मुंबई : प्रकाश आंबेडकर यांचा अद्यापही आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला तर आम्ही सगळे मिळून त्यावर चर्चा करू. तसेच आमची भूमिका ही सकारात्मक असून आमची भूमिका कुठलीही विरोधात नाही. भाजप हा संविधानिक संपवणारा पक्ष झाला आहे. त्याला थांबवण्याचं काम आमचं आहे. काॅंग्रेस हा देशातला सर्वात मोठा पक्ष असून लहान मोठ्या पक्षांना सोबत घेऊन चालणं हे आमचं काम आहे. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. आज आंबेडकर भवन याठिकाणी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे. त्यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर..! आज भाजपकडून उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
राज्यात शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असून महाविकास आघाडी आहे. आता शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करू. तसेच बाळासाहेबांची मोठी ताकद महाराष्ट्रात आहे. त्याचा नक्कीच फायदा महाविकास आघाडीला होईल. असं राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
“सुषमा अंधारे ही काळी मांजर…!” गजानन काळेंची सुषमा अंधारेंवर जहरी टिका
महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहेत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रूढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सध्या राजकारणात ज्या वाईट रूढी पंरपरा सुरू तो त्या मो़डून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशीही प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीय.
“महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व…! शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीची घोषणा होणार?”
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकुमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे. त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला जात आहे. असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
Read also
- “बाळासाहेबांना शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही”; केंद्रीय मंत्र्यांची व्यक्त केली खंत
- अखेर भीमशक्ती अन् शिवशक्ती युतीची घोषणा..! महाविकास आघाडीत चौथा भिडू..
- “बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अजून बरचं काही घडणार”, शिवसेनेकडून सुचक वक्तव्य
- “पोटनिवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा”
- “पंतप्रधान पदासाठी संजय राऊत अन् राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पहावी”