मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या जम्मू काश्मीरमधून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत जनतेच्या मनात असेल तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. असं भाकीत नोंदवलं आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
गजानन काळेंचं आजपासून नाव गांजा काळे…! अभिजित बिचूकले अन् गजानन काळेंची जुंपली
संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी. तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाचं त्यांचं स्वप्न खरं होणार नाही. 150 देशांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेचं समर्थन पंतप्रधान मोदींना मान्य आहे. असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
आज आंबेडकर भवन याठिकाणी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि वंचितमध्ये युती होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, वंचित आणि शिवसेनेची युती होत असेल तर त्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही. त्यांचा तो अधिकार आहे, मात्र उद्धव ठाकरेो यांना स्वत:च्या पक्षाचे आमदार टिकवता आले नाही. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये घटक पत्र कसे सांभाळावे हे जे गुण आहेत. ते गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणत्या गुणांवर जात आहे हे मला माहिती नाही. असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर..! आज भाजपकडून उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- “सुषमा अंधारे ही काळी मांजर…!” गजानन काळेंची सुषमा अंधारेंवर जहरी टिका
- “महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व…! शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीची घोषणा होणार?”
- चिंचवड पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीची उडी..! भाजप, राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार ?
- पंकजा मुंडेंना भाजच्याच नेत्यांकडून बदनाम करण्याचा कट, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य