मुंबई : राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यस्थित करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला राज्यपाल पदापासून मुक्त करावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेनेचे खासदार अरविंद सांवत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक”; काॅंग्रेसकडूनही हिरवा कंदील
ते म्हणाले की, देर आये दुरूस्त आये.. घटनाबाह्य जितक्या कृती केल्या त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही. उशीरा सुचलेले शहाणपण, वेळेत दिला असता तर महाराष्ट्राच राजकारण वेगळं दिसतं असतं. ज्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यापालांनी शपथ दिली ती कुणाच्या शिफारशीमुळे दिली. असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
“बाळासाहेबांना शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही”; केंद्रीय मंत्र्यांची व्यक्त केली खंत
राज्यपालांनी थोर महापुरूषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजप नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपची भावना दिसते. महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला गेला होता का? असा सवाल करीत मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का ? असा खोचक टोलाही काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हाणला आहे.
देर आये दुरुस्त आये!!! घटनाबाह्य जितक्या कृती केल्या त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही. उशीरा सुचलेले शहाणपण, वेळेत दिला असता तर महाराष्ट्राच राजकारण वेगळं दिसलं असतं. ज्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी शपथ दिली ती कुणाच्या शिफारशीमुळे दिली?? @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/cCgE7Hk86r
— Arvind Sawant (@AGSawant) January 23, 2023
Read also
- “काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीही सोबत येतील, त्यांच्याशी आमचं फक्त मुद्यांचे भांडण”; प्रकाश आंबेडकर
- “महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदींची भूमिका”
- मला राज्यपाल पदापासून मुक्त करा..! भगतसिंह कोश्यारी यांची नरेंद्र मोदींकडे मागणी
- …त्यामुळेच शिवशक्ती अन् भीमशिक्ती एकत्र आली..! उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- “कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य