मुंबई : राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यस्थित करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला राज्यपाल पदापासून मुक्त करावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अखेर भीमशक्ती अन् शिवशक्ती युतीची घोषणा..! महाविकास आघाडीत चौथा भिडू..
राज्यपालांनी थोर महापुरूषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजप नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपची भावना दिसते. महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला गेला होता का? असा सवाल करीत मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का ? असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
“बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अजून बरचं काही घडणार”, शिवसेनेकडून सुचक वक्तव्य
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शुरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरीता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरीत काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यक्तीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिलं असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
“पोटनिवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा”
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहिले. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलने केली होती. तसेच 12 विधान परिषदेच्या सदस्यांवरून देखील त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती.
१/२ राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही pic.twitter.com/4XjiVhilmp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 23, 2023
Read also
- मला राज्यपाल पदापासून मुक्त करा..! भगतसिंह कोश्यारी यांची नरेंद्र मोदींकडे मागणी
- …त्यामुळेच शिवशक्ती अन् भीमशिक्ती एकत्र आली..! उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- “कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य
- “शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक”; काॅंग्रेसकडूनही हिरवा कंदील
- “बाळासाहेबांना शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही”; केंद्रीय मंत्र्यांची व्यक्त केली खंत