मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळाला. त्यातच त्यांनी अलिकडेच केलेल्या महाराष्ट्रातील संत, समाजसुधारकाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य मुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमी चर्चेत राहिले आहेत. यातच आता राज्यपाल पदापासून मुक्त करावं, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
“बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अजून बरचं काही घडणार”, शिवसेनेकडून सुचक वक्तव्य
त्यांनी यासंदर्भात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शुरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरीता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरीत काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यक्तीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिलं असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
“पोटनिवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा”
दरम्यान, मागील काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपाल नेहमी चर्चेत राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रखर शब्दात टिका करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात अनेक राज्यात आंदोलने, मोर्चे निघालेत.
Read also
- …त्यामुळेच शिवशक्ती अन् भीमशिक्ती एकत्र आली..! उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- “कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य
- “शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक”; काॅंग्रेसकडूनही हिरवा कंदील
- “बाळासाहेबांना शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही”; केंद्रीय मंत्र्यांची व्यक्त केली खंत
- अखेर भीमशक्ती अन् शिवशक्ती युतीची घोषणा..! महाविकास आघाडीत चौथा भिडू..