मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्ताने आज ष्णमुख सभागृहात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली . या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच सोन्याचं अंड देणारी मुंबई कापण्याची तयारी सुरू आहे. असं म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.
…त्यामुळेच शिवशक्ती अन् भीमशिक्ती एकत्र आली..! उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
उद्धव ठाकरे म्हणाले की, तोच जोश तोच उत्साह आणि तीच गर्दी. अनेक दिवसानंतर एका मोकळे वातावरणात शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस. हे समोर जे आहे ते विकल्या जाऊ शकत नाही. मला पण एक माहिती कळाली, राऊतांना अनेक देशाचे पंतप्रधान भेटले. मला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटले मला म्हणाले. मी उद्या भाजपात चाललोय. उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात अथवा भाजपात गेलेत तर नवल नाही. असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
“कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य
आज प्रकाश आंबेडकर सोबत आले. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांचे हिंदुत्व थोतांड. कलिना विद्यापीठाच्या कार्यक्रमाची आठवण. आज दोन्ही नातू एकत्रित आले. चीन दौऱ्याची आठवण. आज सुभाषबाबूंचा, प्रमोद नवलकरांचा वाढदिवस. तिकडे विधिमंडळात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण. परवा बाळासाहेबांचाचा माणूस, काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो? सरदार पटेल, बाबासाहेब, बाळासाहेब पण आमचेच. मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय तुम्ही कुणीच नाही हे तुम्हीच सिध्द केले. असंही ते म्हणाले.
“शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक”; काॅंग्रेसकडूनही हिरवा कंदील
पुढे बोलतांना ते म्हणाले की, या महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही. आपल्या कामाचेच पंतप्रधानांनी भूमिपुजन केले. तीन वर्ष आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपुजन करु शकलात. मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुध्दा. २००२ पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली. कोस्टल रोड विना टोल आपण देतोय. मनपाचा उपक्रम हा त्या ठेवीतून. त्यातील ३०-४०% रक्कम हा कामगारांचा आणि इतर कामांचा. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते, त्यांना ती कापायची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे.
मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसं? कोश्यारींना खर तर हाकलून द्यायला हवे होते. आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त ही बातमी आली. महापुरुषांचा अपमान सहन करणारे ही कसले बाळासाहेबांची माणसे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे दगडविटांच्या आहेत. दगडाचा उपयोग कोण कोण कस करत हे सगळ्यांना माहिती आहे. आज नाटक आहे आमनेसामने. पुढे सभा घेऊच. आता होऊन जाऊ देऊ आमने सामने. असंही त्यांनी म्हटलंय.
Read also
- “कसबा पेठ मतदार संघ काॅंग्रेसकडे आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार”
- “घटनाबाह्य जितक्या कृती केल्या, त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही”
- “काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीही सोबत येतील, त्यांच्याशी आमचं फक्त मुद्यांचे भांडण”; प्रकाश आंबेडकर
- “महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदींची भूमिका”
- मला राज्यपाल पदापासून मुक्त करा..! भगतसिंह कोश्यारी यांची नरेंद्र मोदींकडे मागणी